VIKASPARV 5.0

Menu
Logo

उल्हास नदीवरील पूल

बदलापूरच्या उल्हास नदीवर १८ कोटीचा पूलः बदलापूर शहरात वाहणारी उल्हास नदी ही पावसाळ्यात धोकादायक पातळी गाठते. तो धोका लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील उल्हास नदीवर नव्याने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात पाणी वाहून जाण्यासाठी अधिकचे गाळे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार या पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून हा उल्हास नदीवरचा पूल उभारण्यात आला. उल्हास नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे हा नवा पूल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

वांगणी – काराव उल्हास नदीवरील पूलः वांगणी रेल्वे स्थानकातून ग्रामीण भागांना जोडण्यासाठी वांगणी आणि काराव या गावांच्या मध्यभागी उल्हास नदीवर १५ कोटी रुपये खर्च करून नवा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकाशी जोडला गेला आहे. या ठिकाणी जुना पूल जीर्ण झाल्यामुळे नवीन पुलाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. डोणे-निकोप पूलः आमदार किसन कथोरेंच्या माध्यमातून उल्हास नदीवर होत असलेला निकोप-डोणे पूल वांगणी आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे निकोप, मानिवली, वरई, अवसारे ही गावं थेट वांगणीशी जोडली जाणार आहेत. आतापर्यंत नेरळला वळसा घालून १५ ते २० कि.मी. चा प्रवास करावा लागत होता. तो हेळपाटा आता वाचणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK