VIKASPARV 5.0

Menu
Logo

एमआयडीसीची बदलापुरात ५२० कोटींची विकास पर्व जलशुध्दीकरण योजना

बारवी धरणाचे विस्तारीकरणाचे कामप पूर्ण झाल्यानंतर आता या वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यात प्रक्रिया झालेल्या  पाण्याचे वितरण करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला: असून त्याची निविदा देखील काढण्यात आली आहे. एमआयडीसीची जुन्या जलशुद्धीकरण यंत्रणेला पर्याय म्हणून बदलापूर जवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मोठा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तब्बल ५२० कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नव्याने पंप हाऊस उभारले जाणार आहे. यासोबतच १२५ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारले जाणार आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात सर्व रस्ते काँक्रीट करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. ज्या भागातून एमआयडीसीच्या जलवाहिनी जात आहेत त्या भागातील जांभूळ आणि वसत गाव परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK