VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ही दोन महत्वाची शहरे जोडणारा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर दूतगती महामार्ग, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याने जणू काही महाराष्ट्राच्या समृध्दीची भाग्यरेषाच आखली आहे. भिवंडी तालुक्यातील आमने इथे नाशिक महामार्गाला समृद्धी महामार्ग येऊन मिळतो. त्यामुळे सहाजिकच त्यालगत असणाऱ्या मुरबाड मतदार संघासाठी तो लाभदायी ठरणार आहे.

महाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांमधून हा महामार्ग जातो. या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी, आणि शिर्डी ते इगतपुरी या दोन टप्प्यांची वाहतूक सुरू झाली आहे. इगतपुरी ते ठाणे हा टप्पाही लवकरच सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना आपली उत्पादने सर्वदूर पाठविण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण, मुरबाड तालुक्यातील उद्योगांना चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK