छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे बदलापूर… या बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा असून या शहरानं छत्रपतींच्या स्वराज्य विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलीय. मोहिमेवर असताना घोडे बदलण्याचे गाव म्हणजे बदलापूर. छत्रपती शिवाजी महाराजांचा बदलापूर सोबत असलेला ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी उल्हास नदीच्या काठावर महाराजांचा १५ फूट भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.